Saturday, June 17, 2006

आयुष्यात काही लोक असे येतात घेत काही नाही
पण खूप काही देऊन जातात
सोबतीला खूप साऱ्या आठवणीही देतात
ज्या मनाच्या गाभाऱ्यात सदैव पिंगा घालतात
ज्यांच्या आठवणीने मन खूप हुरहुरते
दूर सगळ्यांपासून आठवणीतच रमते
नुसत्या आठवणीने मनात काहूर माजते
त्या व्यक्ती परत परत भेटाव्या सारखे वाटते
जे कधीतरीच शक्य होते
काही वेळेस तर अशक्यच असते
अशा वेळी आठवणींनाच जपायचे असते
मनाच्या खोलवर कुठेतरी दडवायचे असते
मधूनच कधी तरी त्यांच्यात परत रमायचे असते.

No comments: